सहकारी तत्त्व, आदर्शांनुसार काम : विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोल्ली
वैयक्तिक द्वेष बाजूला ठेवल्यासच सहकारी क्षेत्रात यश ७२ वा अखिल भारतीय सहकार सप्ताह उत्सव

बेलगाम प्राईड/ निवडणुकीच्या काळात उद्भवणारे मतभेद, वैयक्तिक द्वेष बाजूला ठेवून, सामान्य जनतेला सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून सहकाराच्या तत्त्व-आदर्शांनुसार काम करावे, असे विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोल्ली यांनी सांगितले.
हिरबागेवाडी येथील श्री जालिकरेम्मा देवी मंगल कार्यालयात कर्नाटक राज्य सहकार महामंडळ, बेंगळुरू आणि बेळगाव जिल्हा सहकार युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ७२ व्या अखिल भारतीय सहकार सप्ताह २०२५ – सहकारी संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण विकासाच्या बळकटीकरणाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन ते बोलत होते.
सहकारी क्षेत्रात सर्वांनी एकदिलाने काम केले पाहिजे. यावेळी वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून काम करणे गरजेचे आहे. तेव्हाच आपण सामान्य जनतेला सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. बेळगाव तालुक्यातून राहुल जारीकिहोळी यांची जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या सहकार्याने शेतकऱ्यांच्या हिताचे काम केले जाईल. सरकार आणि सहकार या दोन्ही स्तरावर काम करण्यात येईल. हा सप्ताह सर्वांना चांगला ठरावा, असेही चन्नराज हट्टीहोल्ली म्हणाले.
देवाच्या आशीर्वादाने आणि सर्वांच्या सहकार्याने मी सहकारी क्षेत्रात प्रवेश केला आहे. बीडीसीसी बँकेचा संचालक असल्याचे, तसेच मलप्रभा साखर कारखान्याचा अध्यक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. सहकारी क्षेत्रात चांगली कामे सुरू आहेत. शेतकऱ्यांसाठी सहकारी बँका आर्थिक बळ आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय बँकांमध्ये शेतकऱ्यांना कर्ज मिळवण्यासाठी असंख्य नियमांचा सामना करावा लागतो. पण सहकारी बँकांमध्ये नियम शिथिल करून कर्ज दिले जाते. नर्सरी तयार करणे, दुग्धव्यवसाय आदी स्वयंपर रोजगारात गुंतण्यासाठी सहकारी बँकांमार्फत मदत दिली जाते. शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज दिले जाते, असे ते म्हणाले.
सहकारी क्षेत्र आपल्या मार्गाने पुढे जात आहे. गावापासून दिल्लीपर्यंत सहकारी क्षेत्राचा विस्तार झाला आहे. सहकारी क्षेत्रात सर्वांनी एकत्रितपणे काम केल्यासच यश मिळते, असेही चन्नराज हट्टीहोल्ली यांनी सांगितले. यावेळी संतोष अंगडी, बसगौड पाटील, शंकरगौड पाटील, शिवनगौड पाटील, हालप्पा जजिनवर, रवींद्र मेळेद, रघू पाटील, भरमप्पा शिगिहळ्ळी, रामण्णा गुळी, मुशेप्पा हट्टी, महंतेश अलाबाडी, सुरेश इटगी, बसनगौड पाटील, चंद्रप्पा शिंत्री आणि गावातील अनेक मान्यवर, ज्येष्ठ उपस्थित होते.




