
बेलगाम प्राईड/ सुवर्ण सौद्याजवळ विविध आंदोलकानी गजबजलेले होते मात्र या ठिकाणी आज एका ज्येष्ठ नागरिकाने केलेल्या एकाकी आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते के. विद्यासागर नामक या आंदोलकाने बेळगाव तहसील कार्यालयातून दलालांना हटवण्याची मागणी करत वृद्धापकाळ निवृत्ती वेतनामध्ये कथित मोठ्या भ्रष्टाचारावर आवाज उठवला.
या एकाकी आंदोलनाचे नेतृत्व करणारे के. विद्यासागर यांनी गंभीर आरोप केला आहे की वृद्धापकाळ निवृत्ती वेतन मिळवणे आता गरीब लोकांसाठी अत्यंत कठीण झाले आहे. या योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार सुरू असून पेन्शन मंजूर करून घेण्यासाठी अर्जदारांना दलालांना ४,००० ते ५,००० रुपयांपर्यंत लाच द्यावी लागते. ही पद्धत खूप अन्यायकारक असून सर्रास सुरू आहे. असा दावा त्यांनी केला.
विद्यासागर यांनी पुढे म्हणाले या भ्रष्टाचारी प्रणालीमुळे गरजू असलेले अनेक ज्येष्ठ नागरिक लाच देण्याची क्षमता नसल्यामुळे पेन्शनच्या लाभापासून वंचित राहत आहेत. याउलट, जमीन आणि मालमत्ता असलेले अनेक अपात्र लाभार्थी दलालांच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे पेन्शन मिळवत आहेत. या गंभीर गैरप्रकारांवर त्वरित उपाययोजना करण्याची आवश्यकता व्यक्त करत, त्यांनी सध्याच्या सर्व पेन्शन लाभार्थ्यांची कसून पुन्हा तपासणी करण्याची मागणी केली. यामुळे अपात्र व्यक्तींना वगळता येईल आणि ही योजना खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.
या एकाकी आंदोलनामुळे घटनास्थळी उपस्थित पत्रकार प्रतिनिधींचे लक्ष वेधले गेले. विद्यासागर यांनी माध्यमांद्वारे शासनाकडे कळकळीचे आवाहन केले. त्यांनी सरकारला निर्देश देण्याची विनंती केली की संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने तपासणी करावी आणि वृद्धापकाळ पेन्शनचा लाभ केवळ समाजातील खऱ्या गरजू सदस्यांपर्यंतच पोहोचेल याची खात्री करावी अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त होत आहे.




