
बेलगाम प्राईड/ पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालांनी देशाच्या राजकीय प्रवाहाची स्पष्ट दिशा दाखवली आहे, विशेषतः पश्चिम बंगालमध्ये हिंदुत्ववादी लाट स्पष्टपणे दिसून आली आहे, असे
भाजप नेते किरण जाधव म्हणाले. एकूण निवडणुकीत लोकांनी विकास, सुरक्षा आणि समानतेसाठी मतदान केले. मात्र, केवळ पश्चिम बंगालमध्येच हिंदू समाजाला दिलेली पसंदी स्पष्टपणे दिसून आली आणि मतदारांनी यावेळी आपले अस्तित्व आणि हक्क जपण्याचा निर्णय घेतला आहे, असे किरण जाधव निकालाच्या सकारात्मकतेबद्दल बोलताना म्हणाले.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाविरोधात लोकांमध्ये मोठी नाराजी होती. कायदा आणि सुव्यवस्थेची बिकट परिस्थिती, राजकीय हिंसाचार आणि महिलांच्या सुरक्षेचे मुद्दे ही मतदारांच्या निर्णयामागील आणि मत परिवर्तनामागील महत्वाची कारणे होती आणि परिणामी, निकाल हिंदुत्ववादी लाटेच्या रूपात समोर आला आहे, असेही किरण जाधव यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर लोकांनी जो विश्वास ठेवला आहे, तो या निकालांमधून दिसून येतो. येत्या काळात इतर राज्यांमध्येही हाच कल कायम राहील, असा विश्वास किरण जाधव यांनी व्यक्त केला.




