मुगेंद्रगौडा एस.पाटील ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ; सरदार मैदानावर आज मुहूर्तमेढ

बेलगाम प्राईड/ शहरातील क्रीडाप्रेमींसाठी उत्साहाची बातमी असून श्री मुगेंद्रगौडा पाटील ट्रॉफी २०२६ या भव्य क्रिकेट स्पर्धेचा आज शुभारंभ झाला. ही स्पर्धा दि. १२ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान सरदार मैदान येथे होणार आहे.
या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने आज सकाळी मुहूर्तमेढ सोहळा पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात विघ्नहर्ता श्री गणेश पूजनाने करण्यात आले. स्पर्धा यशस्वी व खेळाडूंना प्रेरणादायी ठरावी अशी सामूहिक प्रार्थना यावेळी करण्यात आली.
एम.पी. फाउंडेशनचे अध्यक्ष मुगेंद्रगौडा पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आली यावेळी क्रिकेट खेळाचा आत्मा जपणाऱ्या क्रिकेट पिचचे विशेष पूजन देखील करण्यात आले. आगामी सामन्यांसाठी मैदान सज्जमुगेंद्रगौडा एस.पाटील ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ; सरदार मैदानावर आज मुहूर्तमेढ
बेलगाम प्राईड/ शहरातील क्रीडाप्रेमींसाठी उत्साहाची बातमी असून श्री मुगेंद्रगौडा पाटील ट्रॉफी २०२६ या भव्य क्रिकेट स्पर्धेचा आज शुभारंभ झाला. ही स्पर्धा दि. १२ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान सरदार मैदान येथे होणार आहे.
या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने आज सकाळी मुहूर्तमेढ सोहळा पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात विघ्नहर्ता श्री गणेश पूजनाने करण्यात आले. स्पर्धा यशस्वी व खेळाडूंना प्रेरणादायी ठरावी अशी सामूहिक प्रार्थना यावेळी करण्यात आली.
एम.पी. फाउंडेशनचे अध्यक्ष मुगेंद्रगौडा पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आली यावेळी क्रिकेट खेळाचा आत्मा जपणाऱ्या क्रिकेट पिचचे विशेष पूजन देखील करण्यात आले. आगामी सामन्यांसाठी मैदान सज्ज करण्याच्या दृष्टीने नवीन पिच तयार करण्याच्या कामालाही आजपासून सुरुवात करण्यात आली आहे.
ही स्पर्धा स्थानिक तसेच जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंना आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार असून क्रीडाक्षेत्राला चालना देणारी ठरेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. आगामी दहा दिवसांत सरदार मैदानावर रंगणाऱ्या सामन्यांकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष लागून राहिले आहे. करण्याच्या दृष्टीने नवीन पिच तयार करण्याच्या कामालाही आजपासून सुरुवात करण्यात आली आहे.
ही स्पर्धा स्थानिक तसेच जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंना आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार असून क्रीडाक्षेत्राला चालना देणारी ठरेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. आगामी दहा दिवसांत सरदार मैदानावर रंगणाऱ्या सामन्यांकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष लागून राहिले आहे.




